परिवर्तन तरुणाईचे

परिवर्तन तरुणाईचे

मूल प्रौढ बनण्याअगोदर मध्ये एका महत्वाच्या टप्प्यातून जात असते: तारुण्य!

या टप्प्यात प्रवेश करत असलेल्या मुलांना समजून घेत, योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असते. काही बाबतीत पालकच ही भूमिका छान निभावून नेऊ शकतात. पण बहुतेक बाबतीत बाह्य मार्गदर्शक असणे, गरजेचे असते.

आजची ही तरुणपणाच्या उंबरठ्यावर असलेली पिढी भविष्यकाळ घडवणार असते. म्हणून त्यांच्याकडून जबाबदारीच्या अपेक्षा असतात. फक्त त्या अपेक्षा जास्त नको तर रास्त असायला हव्या.

वयानुसार होत असलेल्या शारीरिक व मानसिक बदलांमुळे, काही वेळा तरुणाई विचित्र वागते तर काही वेळा पालकच त्यांना बंडखोरीचे लेबल लावून मोकळे होतात.

आवश्यकता असते ती जाणीव निर्माण करण्याची! जाणीव असेल तर योग्य मार्ग दाखवण्याची!

बिपिन मयेकर
९८१९००१२१५

Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?