यावर एका मित्राने विचारले, "तारतम्य म्हणजे फक्त एव्हढेच काय?" मला सांगावे लागले, "अरे, हे फक्त संवादातील एका कोनावर आधारित आहे. पण तरीही यातील गाभा तारतम्याच्या व्याख्येला लागू होतो. तो म्हणजे स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची योग्य जाणीव!" कुठे व किती पुढे व्हायचे आणि कुठे व किती वेळ थांबायचे; हे नोकरी/व्यवसाय असो वा नातेसंबंध; राजकारण असो वा छंद; हे उमगले_समजले की एक तर प्रगती होते व परिस्थिती विपरित असेल तर अधोगती होत नाही. श्री. अमिताभ बच्चन यांनी हिरोचे रोल करताना, अनेक जबरदस्त सुपरहिट चित्रपट दिले होते. पण नंतर त्यांचे वय वाढू लागले, तरीही हिरोचे चित्रपट करणे सुरु होते. परिणामी चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यांनी पॉझ घेऊन, हळूहळू चरित्र भूमिकांकडे रोख वळवला. आणि त्यात त्यांना प्रचंड यश मिळू लागले. त्यांच्या समकालीन नायकांना त्यांच्याइतके यश मिळालेले नाही. नोकरी करणाऱ्या, अनेक जणांनी थांबून विचारपूर्वक नियोजन करुन व्यवसाय सुरु करुन प्रचंड यश मिळवले आहे. पण काही जणांनी, 'उद्योजक व्हायचं आहे' या भरात, अतिउत्साहाने आपली निवृत्तीनंतरची सर्व रक्कम अर...
जागते रहो.. सावध रहा... एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला. त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा; असा त्याचा दिनक्रम सुरु झाला. दिवस गेले, महिने लोटले.. वर्षे सरली.. पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही. दगड घ्यायचा,साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा.. शेवटी तो माणूस म्हातारा झाला... आणि ज्या क्षणी, तो आपले शेवटचे श्वास मोजत होता.. त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले, ती साखळी सोन्याची झाली होती... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा.. या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही.. तात्पर्य :-प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो... कधी आई- वडिलांच्या रुपाने, तर कधी भाऊ-बहिणीच्या नात्याने.. तर कधी मित्राच्या वा मैत्रिणीच्या नात्याने ... तर कधी जवळच्या नात्याने.... कोणत्या ना कोणत्या रुपात, तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही असतो किवा बनतो, त्यात त्यांचा बराच हातभार असतो .........
विद्यार्थी: दशा व दिशा 'विद्यार्थी' शब्दाचा अर्थ विद्या मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा असा होतो. मी या इथे व पुढे जरी पुरुषवाचक शब्द वापरला तरी तो शब्द, विद्यार्थी मुलगा व मुलगी, अशा दोघांनाही लागू असेल. या लेखातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. ठराविक व विशेष कामगिरी नेमून देणार आहे. 'प्रसन्न' या आमच्या प्रशिक्षण संस्थेत आम्ही लहान मोठी अशा दोन्ही व्यक्तींना एक शिकवण सुरुवातीस दिली जाते ती म्हणजे - 'कोणतेही कार्य सुरु करण्यापूर्वी, तुम्हाला त्याचा हेतू व परिणाम माहीत असावयास हवा.' विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, चला, मग या प्रथम कामगिरीला सुरुवात करा: तुम्ही कशासाठी शिकत आहात व तुमच्या शिकण्यामुळे तुमच्या आयुष्यात काय काय चांगले परिणाम होणार आहेत? याचे चित्र मनात तयार करा व त्यावर तुमचा लेखी अहवाल तयार करुन शिक्षक व पालकांबरोबर चर्चा करा. एखाद्या विद्यार्थ्याला तो कशासाठी शिकत आहेत व त्याला शिक्षणातून काय साध्य करायचे; याची कल्पना नसेल तर अशा विद्यार्थ्याचे अभ्यासात कसे लक्ष लागेल? याऊलट ज्या विद्यार्थ्याकडे 'त्याला आयुष्यात काय बनायचे आहे', हे ध्...
Comments
Post a Comment