"काय रे, कोण?" एका संध्याकाळी रात्री घरी परत येत असताना वाटेत थांबून मोठ्या भावाच्या मित्राने प्रश्न विचारला. मला कळले नाही. मी विचारले, "कोण?" तेव्हा त्याने डोळे मिचकावत विचारले, "अरे, स्टेशनवर दररोज अर्धा एक तास गप्पा मारत असतोस, ती कोण?" मी सहज उत्तर दिले, "मैत्रीण आहे!" त्यावर त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून दबक्या आवाजात विचारले, "बिपिन, अशी कोणती ही मैत्रीण आहे, जिच्या बरोबर तुझ्या इतक्या गप्पा रंगतात? मी शांतपणे सांगितले, "माझे असे मित्र सुद्धा आहेत आणि अजून मैत्रिणी सुद्धा आहेत; त्यांच्यासोबत माझे विचार जुळतात, आवडी-निवडी जुळतात आणि मग त्यांच्याशी मी तासन-तास गप्पा मारू शकतो. हो, आणि स्टेशन वर सुद्धा!" मोठ्या भावाचा मित्र खांदे उडवत जाताना म्हणाला, "आम्ही फक्त बसल्यावरच (🥃), आमच्या गप्पा रंगतात.." मूलभूत स्त्री पुरुष मैत्रिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठेतरी वेगळा होताच, पण आता तो एका बाजूने अधिक मलिन होत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूने तो दृष्टिकोन सुदृढ दृष्ट्या स्वच्छ होत चालला आहे. तरी, निकोप दृष्टिकोन असणाऱ...
यावर एका मित्राने विचारले, "तारतम्य म्हणजे फक्त एव्हढेच काय?" मला सांगावे लागले, "अरे, हे फक्त संवादातील एका कोनावर आधारित आहे. पण तरीही यातील गाभा तारतम्याच्या व्याख्येला लागू होतो. तो म्हणजे स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची योग्य जाणीव!" कुठे व किती पुढे व्हायचे आणि कुठे व किती वेळ थांबायचे; हे नोकरी/व्यवसाय असो वा नातेसंबंध; राजकारण असो वा छंद; हे उमगले_समजले की एक तर प्रगती होते व परिस्थिती विपरित असेल तर अधोगती होत नाही. श्री. अमिताभ बच्चन यांनी हिरोचे रोल करताना, अनेक जबरदस्त सुपरहिट चित्रपट दिले होते. पण नंतर त्यांचे वय वाढू लागले, तरीही हिरोचे चित्रपट करणे सुरु होते. परिणामी चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यांनी पॉझ घेऊन, हळूहळू चरित्र भूमिकांकडे रोख वळवला. आणि त्यात त्यांना प्रचंड यश मिळू लागले. त्यांच्या समकालीन नायकांना त्यांच्याइतके यश मिळालेले नाही. नोकरी करणाऱ्या, अनेक जणांनी थांबून विचारपूर्वक नियोजन करुन व्यवसाय सुरु करुन प्रचंड यश मिळवले आहे. पण काही जणांनी, 'उद्योजक व्हायचं आहे' या भरात, अतिउत्साहाने आपली निवृत्तीनंतरची सर्व रक्कम अर...
जागते रहो.. सावध रहा... एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला. त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा; असा त्याचा दिनक्रम सुरु झाला. दिवस गेले, महिने लोटले.. वर्षे सरली.. पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही. दगड घ्यायचा,साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा.. शेवटी तो माणूस म्हातारा झाला... आणि ज्या क्षणी, तो आपले शेवटचे श्वास मोजत होता.. त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले, ती साखळी सोन्याची झाली होती... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा.. या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही.. तात्पर्य :-प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो... कधी आई- वडिलांच्या रुपाने, तर कधी भाऊ-बहिणीच्या नात्याने.. तर कधी मित्राच्या वा मैत्रिणीच्या नात्याने ... तर कधी जवळच्या नात्याने.... कोणत्या ना कोणत्या रुपात, तो आपल्याला भेटत असतो... आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो...... आपण जे काही असतो किवा बनतो, त्यात त्यांचा बराच हातभार असतो .........
Comments
Post a Comment